आमराईतल्या त्या साऱ्या गोष्टी

आमराईतल्या त्या साऱ्या गोष्टी


अश्याच आठवतात मला...

तुझं ध्यान होतं माझ्याकडे..

अन मी झुलावत होतो

तो स्वप्नाचा झुला...



तुझे केस वारयाने उडायचे

अन् मी त्यांना हाताने अलगद सावरायचे..

मग अचानक् ओठांना एवढे

धाडस् कुठुन यायचे कुणास ठाऊक

कि ते थेट ओठांवर जाऊनच विसावयाचे....



मग अचानक मेघ दाटून यायचे

किती भयंकर तांडव सुरू करायचे

हळुच मग श्रावणसरींनी

डोकावून पहायचे..

अन असच त्या मेघानां श्रावणसरींनी

स्पर्श करून सुखवायचे..



तुझ्या माझ्या मिलनाचं

असचं काहीसं घडायचे..

तुझ्या नाराजीच्या मेघांना

माझ्या डोळ्यातल्या सरींनी

कवेत घेवून कुरवाळायचे...



किती अपरीचीत होते ते क्षण

हरपून जायचे आपूले मन..

किती अंधारले जरी आसमंत..

तरी तुच होतीस माझ्या आशेचा किरण..



मग कातरवेळ दाटून यायची..

विरहाची वेळ समोर उभी रहायची..

उरात चलबिचल अन अस्वस्थता

अन क्षितिजे सुध्दा मावळतीला सॊडून जायची...



मग तुच मला सांगायची

अरे माझ्या राजा...

मी तुझीच आहे रे कायमची..

असा हताश नको होऊस

आनंदी होऊन तयारी कर..

आपूल्या उद्याच्या प्रेमभेटीच्या घडीची..



मग ह्रिदय माझे आनंदित व्हायचे..

क्षणभरासाठी शरीर माझे..

तुझ्याच मिठीत आसरा घ्यायचे...

तु वळायचीस परतीच्या वाटेला ..

अन माझी पाऊले सुध्दा तिकडेच वळायची...



तु मला हसत हसत निरोप द्यायचीस..

उद्या परत चोरून चोरून

भेटण्याचा खाणाखुणा

तुझ्या त्या नजरेने करायचीस...



हे असं मिलन आपूले

आजही आठवते मला..

तु अन तुझ्या आठवणींनेच

तुझ्यावर जिवापाड प्रेम करायला होतं मला.

posted under |
Newer Post Older Post Home
Subscribe to PREMATME
Email:
Visit this group

Followers

About This Blog


Recent Comments